शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय; महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा

in #digras2 years ago

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून आज(शुक्रवार) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली आहे. मात्र मिलिंदि नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध मुद्य्यांवरून वारंवार राज्य सरकारवर टीका केली जात आहे. आता शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एकच खळबळ उडाल्याचे दिसत आहे.CM-Eknath-Shinde-Fadanvis.jpg