प्रवास महागणार! मुंबईत रिक्षाच्या दरात दोन रुपयांनी तर टॅक्सीच्या दरात तीन रुपयांची वाढ
देशात महागाई वाढत असतानाच मुंबईकरांचा प्रवास महागला आहे. पुण्यात रिक्षाच्या दरात वाढ झाल्यानंतर आता मुंबईतही रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. मुंबईतील रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईत रिक्षाची दोन रुपयांनी तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ होणार आहे. दरवाढीच्या या निर्णयावर सोमवारी (26 सप्टेंबर) ला शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान 1 ऑक्टोबरपासून मुंबईत रिक्षा,टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.