Lumpy Virus: पश्चिम महाराष्ट्रात ५९ गावांत २५७ जनावरे लम्पीने बाधित

in #all2 years ago

lumpy-vv_202209881152.jpgपश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, काेल्हापूर व साेलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये ५९ गावांमध्ये २५७ गुरांना लम्पी चर्म राेगाची लागण झाली असून, त्यापैकी १२२ उपचाराअंती बरी झाली आहेत. तर, सध्या १३२ जनावरांवर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात तीन जनावरांचा मृत्यू झाला असून, उर्वरित चारही जिल्ह्यांत एकही मृत्यूची नाेंद झाली नाही. तर ९५ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.