T20 World Cup : Virat Kohli ने ओपनिंग करावी का? गंभीर म्हणाला हा मूर्खपणा...

in #all2 years ago

Gautam Gambhir on Virat Kohli : आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध ओपनिंग करत शतक केले. तेव्हापासून टी-20 विश्वचषकमध्ये विराट कोहलीने रोहित शर्मासोबत ओपनिंग करावी की नाही यावर सतत चर्चा होत आहे. काही माजी क्रिकेटपटूंनीही विराटला या भूमिकेसाठी परफेक्ट म्हटले आहे. मात्र गौतम गंभीर या संपूर्ण प्रकरणाला बकवास मानत आहे. कोहलीने ओपनिंग करावी का? या चर्चेत गंभीरने पाच शब्दात स्पष्टीकरण देत म्हणाला की, हा मूर्खपणा सुरू करू नका.गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या 'गेम प्लॅन' शोमध्ये म्हणाला की, विराटच्या फलंदाजीच्या सलामीबद्दल मूर्खपणा करू नका, जेव्हा तुमच्याकडे केएल राहुल आणि रोहित शर्मा संघात आहेत, तेव्हा विराट कोहलीला सलामी कशी करणार?. मी आधीही बोललो आहे की या मुद्द्यावर वाद घालू नका. तुम्ही नेहमी 3 क्रमांकावर लवचिक असले पाहिजे. कारण जर तुमचा सलामीवीर 10 षटके फलंदाजी करत असेल तर सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले पाहिजे जेणेकरून धावांचा वेग वाढवता येईल. जर विकेट लवकर पडली तर विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर यायला हवे.