युतीवेळी मिरज भाजपला सोडणे चूकच; उद्धव ठाकरे

in #all2 years ago

सांगली : ‘‘मिरज विधानसभा मतदारसंघ हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. तो भाजपला सोडणे ही चूकच होती. ती आता सुधारू, मिरजेत पुन्हा शिवसेना वाढवू. त्यासाठी मी स्वतः लक्ष घालेन. क्रांतिकारकांचा जिल्हा शिवसेनेला साथ देईल, असे काम उभे करा’’, अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. जिल्हा प्रमुख संजय विभुते, माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महिला आघाडी प्रमुख सुजाता इंगळे आदी उपस्थित होते. श्री. ठाकरे यांनी शिवसेनेच्या निष्ठावंतांसोबत फोटोसेशनही केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जमिनीवर भारतीय बैठक घालत ठाकरेंसोबत छायाचित्र काढून घेतलेUntitled_6.jpg