ओबीसी आरक्षण: आदर्श उत्तरासाठी तिन्ही सरकारांचे प्रयत्न आवश्यक - नरके

in #yavtmal2 years ago

पुणे : महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या पेचप्रसंगावर ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरी नरके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आदर्श उत्तरासाठी केंद्र, मध्य प्रदेश, महाराष्ट्र सरकारने सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (For Ideal Answer on OBC Reservation Central govt Madhya Pradesh Maharashtra govt Efforts Needed Hari Narke)एकामागून एक तीन ट्विट करत नरके यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं की, जेव्हा असे प्रश्न विचारले जातात ज्याची आदर्श उत्तरं परीक्षकालाच माहिती नसतात, तेव्हा विद्यार्थी नापासच होणार ना? सुप्रीम कोर्ट म्हणतं, तीन कसोट्यांवर टिकेल अशी ओबीसींची अनुभवजन्य सर्वांगीण, ताजी, प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय माहिती जमा करा व राजकीय आरक्षण का आवश्यक आहे ते पटवून द्या.