Team India: `...म्हणून रोहितने मला बॉलिंग दिली नाही`, व्यंकटेश अय्यरचा मोठा गौप्यस्फोट!

Venkatesh Iyer On Rohit Sharma: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) टीम इंडियाला सर्वाधिक कमी जाणवली ती गोलंदाजांची. मोक्याच्या क्षणी मैदानात उतरून कमाल करून दाखवणारे गोलंदाज टीम इंडियामध्ये (Team India) फार कमी आहेत. वर्ल्ड कपमध्ये ऑलराऊंडर्स खेळाडूंची देखील कमतरता दिसून आली. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये ऑलराऊंडर्स (All rounders) खेळाडू जास्त असावेत, अशी प्रतिक्रिया क्रिडातज्ज्ञांनी वर्तविली होती. इंडियाला सलामीवीर अष्टपैलू खेळाडूची गरज होती. त्यात नाव होतं ते व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांचं...