Sangli Crime : इस्लामपूर पोलिसांनी 15 गावांमध्ये 2 दिवस शेतकरी वेशांतर करून ट्रक चोरट्याला केलं जेरबंद!
चोरीच्या ट्रकच्या शोधासाठी 15 गावात 2 दिवस इस्लामपूर पोलिसांनी शेतकरी वेशांतर करुन ट्रक चोरट्यांला ट्रकसह जेरबंद करण्यात यय मिळवले. लोकांना शंका येऊ नये म्हणून ऊसतोडणी टोळ्यांना नेण्यासाठी आलो आहे, असे सांगत शेतकरी बनलेल्या पोलिसांनी 15 गावांमध्ये भटकंती करत या चोरट्यास पकडले.
उस्मानाबाद व बीड जिल्हा हद्दीतील 15 गावात 2 दिवस पोलिसांना शेतकरी वेशांतर करुन या चोरट्याचा माग काढावा लागला. इस्लामपूर जवळील पेठ नाका येथून हा ट्रक चोरीला गेला होता. दत्तात्रय बापू कांबळे (वय 26 , रा. सांगोला, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्याच्यावर सांगली, सोलापूर, मुंबई या जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत.