सकाळी रिक्षा चालवायचे आणि रात्र होताच सुरु
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: स्टेशनकडे चालत जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सात जणांच्या टोळीत तीन रिक्षाचालकांसह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सागर उर्फ मुन्ना शर्मा, जेम्स सुसे, सत्यकुमार कनोजिया, सचिन ऊर्फ पिल्लू राजभर, सोनू कनोजिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामधील मुन्ना व सत्यकुमार हे रिक्षाचालक असून तेच मुख्य सूत्रधार होते. दिवसभर रिक्षा चालविण्याच्या नावाखाली ते रेकी करत प्लॅनिंग करत असत. रात्री सर्वजण एकत्र येत निर्जन स्थळी पादचाऱ्याला गाठून त्याला मारहाण करत लुटले जात असे. या टोळीविरोधात डोंबिवली रामनगर, टिळकनगर, मानपाडा, हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली