शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार? ठाकरे गटाच्या या नेत्यानं केली भविष्यवाणी
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पहिल्यापासून पटत नव्हतं, आताही पटत नाही असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हंटलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार दोन महिन्यात पडेल असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी रावसाहेब दानवे आणि संजय राऊत यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. रावसाहेब दानवे यांनी देखील हसत-हसत राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणून खळबळ उडवून दिली होती. त्याचाच आधार घेत संजय राऊत यांनी सरकार पडणार असा दावा करत असतांना रावसाहेब दानवे हे कधी कधी खरं बोलतात असाही दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. सुरुवातीपासूनच शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर आरोप करत ते कधीही कोसळू शकते असा आरोप विरोधकांनी वारंवार केला आहे. मात्र, याच दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा दावा करत चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.