भर मैदानात रोहितने धरला दिनेश कार्तिकचा गळा! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात नेमकं काय घडलं?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव झाला. या सामन्यात भारताने २०८ धावांचा डोंगर उभारूनही ऑस्ट्रेलियाने चार गडी राखून आपल्या नावावर विजय नोंदवला. भारताच्या बाजूने हार्दिक पंड्याने ७१ धावांची नाबाद खेळी केली. तर ऑस्ट्रेलिया संघाकडून कॅमेरून ग्रीनने ६१ धावा करून ऑस्ट्रेलियासाठी विजय सोपा करून दिला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र यामध्ये ते अयशस्वी ठरले. याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कर्णधार रोहित शर्माने यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा थेट गळाच पकडला.
Please use a correct tag....