सेनेनंतर आता कॉंग्रेसमध्ये फूट? आमदार संग्राम थोपटे फडणवीसांच्या भेटीला
मुंबई : शिवसेनेच्या अनेक आमदार-खासदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील माहाविकास आघाडी सरकर कोसळलं. दरम्यान शिवसेनेत झालेल्या या बंडखोरीनंतर आता कॉंग्रेसला देखील खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. कारण कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर राज्यात शिवसेनेनंतर आता कॉंग्रेसचे आमदार फुटणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.