ऋतुराज गायकवाडचे विक्रमी शतक; नाबाद २२०
Ruturaj Gaikwad: सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनल मॅचमध्ये धमाकेदार शतक झळकावले. या स्पर्धेतील गेल्या ९ डावातील हे त्याचे ६वे शतक ठरले.
नवी दिल्ली: विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनल मॅचमध्ये ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा धमाका केला. आसामविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने १२५ चेंडूत १६८ धावा केल्या. यात १४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.याआधी ऋतुराजने क्वार्टरफायनल मॅचमध्ये ऋतुराजने एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारले होते आणि २२० धावांची खेळी केली होती. सेमीफायनल लढतीत ऋतुराजला द्विशतक करता आले नाही पण त्याने गोलंदाजांची धुलाई मात्र केली. या सामन्यात ऋतुराजने १३३.३३च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने फक्त ८८ चेंडूत शतक पूर्ण केले.विजय हजारे स्पर्धेच्या या हंगामात ऋतुराजने ९ डावात ६ शतक आणि १ द्विशतक केले आहे.