शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत मिळणार ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान
सोलापूर : राज्यातील २८ लाख शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. बॅंकांनी दिलेल्या याद्यांची छाननी आता पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणानंतर अंतिम याद्या प्रसिध्द होऊन त्याचे चावडी वाचन होईल. त्यानंतर १५ दिवसांत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे.