ढगफुटी सदृश्य पावसाचं थैमान, सात गावांचा संपर्क तुटला, कुठे घडली घटना?

in #nagpur2 years ago


पिशोर परिसरातील भारंबा वाडी, कोळंबी तांडा-भारंबा, माळेगाव ठोकळ, जैतखेडा, माळेगाव लोखंडी, साळेगाव यासह इतर गावांचा संपर्क तुटला आहे.
औरंगाबादः राज्यभरात परतीच्या पावसानं (Rain) जोर धरलाय. औरंगाबादमध्ये (Aurangabad Rain) आज सकाळपासूनच संततधार पाऊस सुरु आहे. पण काही भागात वरुणराजानं उग्ररुप धारण केलंय. कन्नड तालुक्यातल्या (Kannad) पिशोर परिसरात रविवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसाने नदी नाल्यांना पूर आलाय. यामुळे पिशोरमधील अंजना पळशी प्रकल्प ओव्हर फ्लो झालाय. त्यामुळे या परिसरातील सात गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. अत्यंत आवश्यक कामासाठीही गावाबाहेर कसं पडायचं, असा प्रश्न गावकऱ्यांसमोर आहे.