सर्वधर्म समभाव, सर्वधर्म सद्भाव; भारत जोडोत दिला नारा….
राहुल गांधी यांनी लिहिले, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समरसता असं सांगताना त्यांनी भारताच्या शांततापूर्ण आणि प्रगतीशील भविष्याचा तो पाया असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
म्हैसूरः देशात 2014 साली भारतीय जनता पार्टीचे सरकार (BJP Goverment) आल्यानंतर काँग्रेसची प्रचंड मोठी पिछेहाट होण्यास सुरुवात झाली. अनेक राज्यातून सत्ता गमवल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या अस्तित्वासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पुन्हा मैदानात उतरले आहेत. भारत जोडो यात्रेतही राहुल गांधींनी नवनवे प्रयोग करत ही यात्रा आता केरळ मार्गे कर्नाटकात येऊन पोहचली आहे. राहुल गांधींनी सोमवारी म्हैसूरमध्ये मंदिर, मस्जिद आणि चर्चेमध्ये (Temples, Mosques and Discussions) जात प्रार्थना केली आहे.