राज्यपालांच्या विरोधातील संताप काही कमी होईना, २८ तारखेला उदयनराजे कोणती भूमिका घेणार
त्यांना दिल्लीत बोलावून समज दिली जाईल, अशी अपेक्षा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
मुंबई – राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि शिंदे गटानं आक्षेप नोंदविला. अनेक शहरांमध्येसुद्धा आंदोलनं झाली. छत्रपती शिवाजी राजे यांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेत राज्यपालांवर घणाघात केला. पण, राज्यपालांच्या विरोधातील हा संताप काही कमी होताना दिसत नाही. कारण २८ तारखेला पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उदयनराजे आपली भूमिका स्पष्ट करतील.