दंड वाढला, तरीही अपघात कमी नाहीत! दरवर्षी बाराशे कोटींची दंड वसुली

in #news2 years ago

सोलापूर : बेशिस्त वाहनचालकांच्या दंडाची रक्कम दुप्पट करूनही आणि दरवर्षी दीड हजार कोटींचा दंड वसूल करूनही रस्ते अपघात कमी झालेले नाहीत. जानेवारी २०१९ पासून २२ मे २०२२ पर्यंत जिल्ह्यातील विविध मार्गांवर साडेतीन हजार अपघात झाले असून त्यात तब्बल दोन हजार जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात एकाचवेळी एकापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेले अपघात सर्वाधिक आहेत.